Sunday 5 July 2015

भाग आठवा आणि शेवटचा : एक गोष्ट त्यांची पण

भाग आठवा आणि शेवटचा :  एक गोष्ट त्यांची पण 

आकाश , आणि  त्याचे मन त्याच्या नावा   इतकाच मोठे होते . म्हणूनच त्याला सगळ्या गोष्टींचा त्रास जास्त होत होता . आपल्या घरी  राहायला आल्या पासून , त्याला एकी कडे बरे पण वाटत होते आणि दुसरी कडे भूतकाळ सतत डोळ्या समोरून जात होता . किती छोटे छोटे प्रसंग , आणि त्याचे किती वेगवेगळे अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने . त्याला उगचाच तो दिवस आठवला . इरा आणि आजी , कंटाळा आला म्हणून आठवडा भर ,  आजीच्या बहिणीकडे , म्हणेज आमच्या मावशी आज्जी कडे  कडे गेल्या होत्या . तिला हि त्यांची सोबत हवीच होती . आकाश साधारण १४-१५ वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट . आई बाबा आणि तो असे तिघेच घरात होते . आई बाबा काही तरी बोलत होते , आकाश त्याच्या रूम मध्ये अभ्यास करत बसला होता ,, एकदम त्याला 
इराचे नाव ऐकू आले आणि बाबा चा आवाज थोडा मोठा झाला , ते आई शी इतक्या मोठ्या आवाजात का बोलत आहेत असे त्याला वाटले , आई बाबांचे बोलणे असे ऐकू नये हे माहित असताना पण तो ऐकत होता 
"हे शक्य नाहीये , म्हणजे अधून मधून सुट्टीला जाने इथ पर्यंत ठीक आहे . आणि ती आपल्या मुलांना कधी पण भेटू शकते , पण इरा साठी म्हणत असशील तर शक्यच नाही . तू स्वताच जें ठरवले होतास ते कसे विसरू शकतेस आणि आई , आणि आकाश ला तर अजिबात आवडणार पण नाही "- बाबा 
"पण अरे मी कायमचे थोडी न म्हणतीये , १-२ वर्षाचा तर प्रश्न आहे . विनिताला पण गरज आहे बदलाची . आणि जवळच तर जायचे आहे "- आई 
"नाही , नको . हा निर्णय माझ्या वर लादू  नकोस प्लीज . विनीता काही गैर समज करून घेणारा नाही , मी बोलेन तिच्याशी , हवे तर आई पण बोलेल " -बाबा 
"पण …."-आई 
"मला वाटते , आपण इथच थाबु यात या विषय वर "- बाबा 
आकशा ला चैन पडलाच नाही , विनीता मावशी , आई , इरा काय चाललाय नक्की . मी विचारतोच . त्यांना नाही आवडले तरी चालेल 
"आई , बाबा , रागावू नका पण नक्की काय चाललाय . मला काहीसे कानावर पडत होते . इरा चा विषय होता म्हणून मी विचारतोय . "
"आकाश तू यात पडू नको , तसे हि तुझ्या बाबांनी हा विषय थांबवला आहे "
"आई , पण मला कळलाच पाहिजे , कारण मला आवडणार नाही असे बाबा म्हणाले ., म्हणजे जर हा विषय पुढे गेला असता तर माझ्या पर्यंत येणार होता , मला सांगा काय ते ,"
" तुझ्या बाबा न च विचार "
"ठीक आहे आकाश , मी सांगतो तुला . तस हि कधी न कधी सगळे बोलायला हवच होते , फक्त इतक्या लवकर नको असे मला वाट होते "
"असे काय आहे नक्की बाबा "
"ऐक , आकाश . तुला तर माहितीये कि विनीता चा किती जीव आहे तुमच्या वर ते ."
"हो , विनीता मावशी , सख्खी नसली तरी त्या पेक्षा जवळची आहे आपल्याला . आई इतकाच तिचे प्रेम आहे आमच्या वर. पण त्याचे काय आता  "
 "मावशी एक वर्ष भर पुण्याच्या बाहेर जायचे म्हणतीये , जवळच . म्हणजे सातारा इथे . तुला तर माहितीये तिचे सासर आहे ते आणि समीर काका तिकडे पण एक कारखाना सुरु करायचा म्हणतोय . तर ती म्हणत होती कि एक वर्ष भर आम्ही तिकडेच राहणार आहोत , ती पण तिथेच क्लिनिक सुरु करेल , एखाद्या वर्ष नंतर परत येतील . त्या दोघान पण बदलाची गरज आहे . पण ती तुम्हा दोघांना खूप मिस करेल असे म्हणत होती "
"त्यात काय मग , सातारा जवळच तर आहे , आम्ही सुट्टी दिवशी जाऊ कि भेटायला तिला . "
"अरे तेच तर आकाश , जवळ आहे म्हणूनच मी तुझ्या बाबाला म्हणत होते कि "- आई 
"मी सांगतोय न त्याला , मला बोलू देत मग. विनीता म्हणाली कि तुअम्चय दोघा पैकी कुणी तरी एक जावू शकेल का तिच्या सोबत , शाळा वगैरे बघेल ती तिकडे  "
"काय ? असे म्हणाली मावशी . पण खरच ती का जातीये तिकडे , समीर काका येवून जावून करू शकतोच कि . म्हणजे कळतंय मला कि तिला आम्ही सोबत असावासे वाटतय , पण कसे शक्य आहे ते आणि आई तू काय आई इरा ला पाठवणार होतीस का , कसे शक्य आहे , किती लहान आहे ती आणि मला नाही चालणार , मी बोलतो मावशी सोबत आणि इतकाच असेल न तर मी  जातो "
"अरे आकाश , तुझी महत्वाची शाळेची वर्षे आहेत , इरा तशी लहान आहे अजून , एखादे वर्षे , अगदी नाही करमले तर २ महिन्यात परत येयील कि ती "
"नाही आई , शक्यच नाही .असे कसे तू म्हणू शकतेस . इरा ला सवय तरी आहे का ग , आपल्याला सोडून रहायची आणि आपल्याला तरी करमेल का ? मुळीच नाही , मी सांगून ठेवतोय आणि जायचे असेलच तर मीच जाईन . आणी मावशी सहज म्हणाली असेल तर तू इतके सिरीयासालि का घेतले आहेस . मावशी कधीच असे म्हणणार नाही . ती सहज बोलली असेल आणि तू मनावर घेतलेस . हा विचार काढून तक डोक्यातून आणि मावशी पण नाही जाणार मी आताच बोलतो तिच्या शी …"
"आकाश ,तू काही बोलणार नाहीयेस विनीता सोबत , फोन ठेव खाली . आणि माझ्या शी पण असे  का बोलतो आहेस "
"काय चुकले माझे आई , तू  मावशीला समजवायचे  सोडून , मला आणि बाबाला समजावत आहेस "
"खरे म्हणतोय ग तो , मी बोलेन आकाश , विनीता सोबत . ती सहजच म्हणाली असेल "
"म्हणजे तुम्हा दोघांना असे वाटतंय कि मीच तयार झालाय इरा ला पाठवायला आणि  तुम्हाला च काय ते विनीता बद्दल खात्री आणि इरा काय फक्त तुमची मुलगी आणि ह्याच बहिण आणि माझी कुणीच  नाहीये का ?"
"आई , असे आम्ही म्हणलाय तरी का ,  तू उगाच विषय भलती कडे नेवू नकोस "
"आकाश , तू खूप बोलतोयेस . ठीक आहे हा विषय इथेच संपला . मी सांगेन विनीता ला काय असेल ते "- आई 
"आई , तू एकटी का ? आपण सगळे बोलू न तिच्या शी . कदाचित ती सातार्याला जाण्याचा निर्णय बदलेल  सुद्धा . पण इरा इथेच राहील आणि अगदी वाटले तर मी जैन मावशी सोबत "
"आकाश , तू कुठे हि जाणार नाहीयेस "- आई 
"आई , इरा गेलेली चालेल आणि मी का नको "
"अरे कारण ९-१० वि महत्वाची वर्षे आहेत , म्हणून "- आई 
"आकाश , इरा नाही जाणार बेटा , मी आतच विनीत शी बोलतो "- बाबा 
बाबा आई चे काही न ऐकता मावशी सोबत फोन वर बोलले , पण त्यांच्या रूम मध्ये  जावून .  ते आले आणि न राहवूनच मी विचारले 
"काय म्हणाली मावशी ?"
"काही नाही रे आकाश , ती म्हणाली मी सहजच विचारले . बोलता   बोलता  विषय निघाला म्हणून . आणि तसा हि त्यांचे पण अजून नक्की नाही , आणि ती म्हणाली कि मला माहितीये कि हे असे अवघड आहे इरा ला किंवा तुला चल म्हणणे . त्ये पेक्षा सुट्टीला तिकडे किंवा आम्ही पुण्यात राहिलो तर अधून मधून मुले येत राहू देत . नेहमी येतात तशी । मला वाटते विनीता चे पण अजून काही जायचे नक्की  नाही आहे आणि माझे तिचे बोलणे झालाय आता. "
आकाश इतके ऐकून निघाला आणि तेवढ्यात आई अगदी हळू आवाजात जे पुटपुटली ते त्याला ऐकू गेले 
"मी इराचे इतके करून पण तू मला आरोपीच्या पिंजऱ्या मध्ये उभे केलेस "
"असे काही नाहीये अग , मला महितोये कि इरा चे तू मुली सारखाच :- बाबा 
"सारखाच म्हणजे मुलगीच आहे ती माझी "- ऐं 
आकशा मागे वळला , आणि इतकाच म्हणाला मी ऐकले , आत मला सगळे पूर्ण सांगा . बाबा सांगायला तयार नव्हता , पण आई  मात्र म्हणाली उगाच नंतर गैर समज नको , तो मोठा आहे आता. आकाश ऐकत होता पण त्याला खूप टेन्शन आले होते कि हे लोक काय सांगणार आहेत 
आई सांगत होती आणि तो कानात प्राण आणून ऐकत होता 
"आकाश , तुला इरा पहिल्यांदा या घरात आली ते आठवते "
"हो आई "
"मग ऐक , ती या घराची मुलगी आहे , पण तुझी सख्खी बहिण नाही ."
"म्हणजे ?"
"सांगते आकाश . त्या आधी  एक दीड वर्षे आम्ही बाहेर होते . आणि अवि काका पण बाहेरच होता . आणि तो परत यायची शक्यता कमीच होता . अगदी निष्णात डॉक्टर होता तो . पण आम्ही इथली जबाबदारी घायला समर्थ आहे हे कळले तसा तो या सगळ्या पाशातून मुक्त झाला आणि जिथे गरज आहे त्याच  ठिकाणी सेवा करायची असे त्याने ठरवले . त्याला खर तर संसार , मुले या पाशात अडकायचे नव्हते . तुझा जन्म झाला न तेव्हाच मला म्हणाला , कि हा माझा पण मुलगाच आहे कि , माझे बाप म्हणून जे काही प्रेम द्यायचे असेल ते याला देईन . "
"आई , ते सगळे खरय , म्हणजे मला तसे माहित नाही , पण अवि काका मला आठवतोय . मी खूप लहान होतो तरी सुद्धा . पण  हे सगळे तू आता का ?"
"ऐक आकाश . तुला आठवत एकदा तू जुने फोटो पाहून म्हणाला होतास कि इराचे डोळे आणि अवि काकाचे डोळे सारखे  वाटतात , म्हणजे त्यातले भाव सारखे वाटतात . वाटणारच न कारण … "
"कारण, म्हणजे  तुला असे म्हणायचे आहे कि इरा अवि काकाची , आय मीन ती अवि काकाची मुलगी "
"पण आई कसे शक्य आहे , तू आताच तर म्हणलीस कि काका ला हे सगळे नको होते , मग इरा … आणि मला कसे नाही माहित आणि आज्जी ला , आणि आजोबाना ?"
"सांगते सगळे  सांगते . आजी , आजोबाना माहित आहेच . तू लहान म्हणून तुला सांगितले नाही आणि तशी गरज पण वाटली नाही "
"हो आकाश , आम्हाला तुला सांगायची गरज वाटली नाही कारण इरा आपलीच आहे . आणि तुमचे इतके प्रेम बघून तर आम्हाला खूप आनंद वाटतो "- बाबा 
"पण मग इअरचि आई ? तिला इरा नको होती "
" नाही नाही , तसे काहीच नाही दुर्दैवाने अवि काका आणि इराची आई दोघे पण या जगात राहिले नाहीत . इराच्या जन्म नंतर काही महिन्यातच ती गेली आणि अवि काकाला इरा ला साम्भायाला मदत म्हणून आम्ही त्याचे कडेच गेलो आणि इराचे लळा  लागला आम्हाला . पण तरी अवि काका परत यायला तयार नव्हता  आणि इरा ला पाठवायला सुद्धा . म्हणून थोडे दिवस आम्हीच राहलो आणि नंतर थोडे दिवस आजी आजोबा येणार असे ठरले होते "
"पण आई मला काही आठवत नाहीये कि , काका मला म्हणाला कि काकू आणलीये तुला किंवा बहिण आहे तुला "
"नाही राजा , तू लहान होतास आणि दुर्दैवाने तुझी काकू या घरात येवूच नाही शकली . कारण त्यांनी तिकडच  लग्न केले आणि ते पण आजी चा आग्रह म्हणून . तुझी काकू सुधा काका सारखीच होती , तिला पण आपली रुग्ण सेवा दुर्गम भागात करायची होती , म्हणूनच ते दोघे कदाचित एकमेकांच्या प्रेमात पडले . आजी च्या लक्षात आले एकदा , ती तिकडे असताना , आजी म्हणाली लग्न करा मग , तुमचे ध्येय एकाच आहे तर संसार त्याच्या आड येणार नाही . आधी काका ला पटले नाही . आणि शेवटी लग्नाला एक मान्यता आहे , ती फक्त प्रेमाला नाही . तरी हि काका लगेच तयार झाला नाही .  पण काय माहित , एकदा फोन केला आणि म्हणाला आजी आजोबाना कि लग्न करेन , पण इकडेच , अगदी सध्या पद्धतीने . काय झाले काय माहित , पण त्याने ठरवले . नंतर आम्हाला म्हणाला कि त्याला जेव्हा जाणवले कि संसार आपल्या कामाच्या आड नाही येणार तेव्हा ठरवले. आजी आजोबा गेले तिकडे  , काकाचे लग्न झाले. काका काकू इअक्दे येणार आणि मग एक छोटी पार्टी करायचे असे ठरले खरे . एक दोन महिने असेच गेले  . आपल्या काही जवळच्या नातेवाईक मंडळीना आजोबांनी पत्राने कळवले लग्न झाले म्हणून . पण काकू चा हे घर बघायचा योग आला नाही , तिला लगेचच दिवस गेले आणि प्रवास करणे शक्य नव्हते . खर तर तिने सगळाच अचानक घडले रे . पण काका म्हणाला इतक्यात कुणाला सांगू नका , कारण  तिची परिस्थिती नाजूक आहे . म्हणून मग मी आणि बाबा तिकडेच गेलो , तशी पण आजोबांची अट  पूर्ण करायची होती . इराच्या जन्म नंतर जेमतेम २ महिने जगली ती .  तू इकडे त्यामुळे आजी आजोबा दोघे एकदम येवू शकत नव्हते . एकेकटे येवून भेटून गेले . "
"काकू गेली , पण मग काका ?"
"आम्ही तिथेच होतो आकाश आणि काका एके दिवशी जवळच्या गावातून येत असताना , त्याच्या कार चा भीषण अपघात झाला ."- आईचा गळा  दाटून आला . आणि साहजिकच होते काका फक्त तिचा दीर नव्हता तर तिचा मित्र हितचिंतक आणि godfather होता . 
" फार काही आशा नव्हती . तरी आमचे प्रयत्न सुरु होते . शुद्धीत आला , तेव्हा वाटले कि सुटलो , हा परत आला . "- बाबा 
"हो रे आकाश , आम्ही दोघे पण तसे फार काही मोठे नव्हतो , वयाने . एक आई विना छोटे बाळ  आणि तुझा अवि काका असा मरणाच्या दारात . पण फार धीराचा तो . कदाचित  आम्हाला शेवटचे भेटायचे याच इच्छा  शक्तीने तो शुद्धीवर आला , काही तासच  . मला आणि तुझ्या बाबाला बोलावून घेतले आणि म्हणाल संसारात पडलो हे ठीक होते , पण या पोरी साठी वाईट वाटते , आई पण गेली आणि आता मी . पण तुम्ही आहात , माझी हि आठवण तुम्ही जपा . मला माहितीये कि तुम्ही आई वडिलांचे प्रेम द्यायाल . आकाश मला काही सुचत नव्हते रे . तुअल काय वाटले काय माहित , मला म्हणाला तू आई चे प्रेम देशील ग , पण आकाश हिला बहिणीचे प्रेम देईल का ग ? चुलत म्हणाले न कि उगाच महाभारत आठवते ग आणि कधी कधी वाटते तुम्ही किती पण केले तरी आई बापा विना पोर म्हणून तिला केवळ सह्नुभित मिळेल का ग लोक कडून . तसे नको ग व्हायला .  मला काय वाटले माहित नाही आकाश पण मी  अवि दादाला म्हणाले कि माझीच मुलगी असेल हि . पण तुला चालेल का कि तुझी नाही तर माझी मुलगी म्हणून जिला जग ओळखेल , तुझे अस्तित्व हिरावून कसे घेवू आम्ही . तुझा काका मला म्हणाला कि शक्य असेल तर आम्ही अवीची म्हणून नाही तर आमची म्हणूच इरा ला इकडे आणावे , त्याचे नाही तर आमचे नाव लावून . नाही म्हण्याचे प्रश्नच नव्हता . म्हणजे आम्ही जरी तिला अविदादा चे नाव लावले असते तरी तेवढच प्रेम दिले असते . पण अवि दादाची इच्छा  आम्ही पूर्ण केली   "
"आई , बाबा …  हे इराला ?"
"तिला कसे माहित असेल , जर आम्ही तुला सुद्धा नाही सांगितले . पण आकाश हे तुला आता माहितीये तर "
"खरे सांगू आई , धक्का बसलाय . पण मला इरा बद्दल जे वाटतंय ते तसाच आहे . कारण मला  ती माझी बहिण आहे हे च सत्य माहितीये आणि मला तेच स्वीकारायचे . पण आई एक विचारू ?"
"विचार कि "
"मी विसरू शकेन कि इरा सख्खी नाहीये , पण तू कधी हे विसरू शकशील ?"
"आकाश , तू काय बोलतो आहेस हे , मी इराचे तितकाच केलेय जितके तुझे , किंवा त्या पेक्षा जास्त काळजी आहे मला तिची "
"हो आई , काळजी आहे माझ्या पेक्षा जास्त . पण मला असे वाटते कि काळजी जास्त आहे इराची जबाबदारी म्हणून . अवि काकाच्या ओझ्या खाली ,  पण प्रेमाचे काय? "
"आकाश , मला हे अजिबात आवडले नाहीये तुझे असे बोलणे . इरा बद्दल मला काहीच वाटत नाही असे का वाटतय तुला . खरे सांगू तुझ्या नंतर इरा आली आणि आम्ही भेद जोवू नये म्हणून तुझ्या नंतर इराचा विचार केला आणि नंतर कधी तुझ्या साठी भावंडाचा विचार सुद्धा नाही केला आणि तूं … मला दुखावले आहेस तू आकाश "
"आई असे नाहीये , बाबा तू पण ऐक . मी असे नाही म्हणत आहे कि तुम्ही सावत्र पणा  करताय  पण कधी कधी असे जाणवतंय . म्हणजे आई मला  हक्काने ओरडते तशी इरा ला नाही. म्हणजे ती इरेराचे काही कमी करत नाही , पण त्या करण्यात कधी कधी असे वाटत कि आई टेन्शन मध्ये आहे . जणू चांगली आई होण्याचे बर्डन  आहे तिच्या वर . आई च्या काही काही वागण्याचा संदर्भ आता लागतोय मला . ती त्या जबबदारी खाली आदर्श आई होते हि , पण तरी "आई" नाही वाटत . "
"आकाश , इरा तुला असे म्हणाली ?"- बाबा 
"नाही बाबा . उलट तिला असे च वाटतय कि ती आईची आणि तुझी जास्त लाडकी आहे . बाबा आई सारखे तुला पण टेन्शन आहे का ?"
"माहित नाही आकाश , मी इतका विचार नाहीच करत , पण एक आहे कि तिला पहिले कि कधी कधी जीव गलबलतो , अवीची आठवण येते , आणि असे वाटते कि चुकून या भरात इरा ला सत्य समजणार तर नाही न "
"आई , बाबा , आपण हे इराला कधीच नाही सांगायचे . तसे हि अवि काका तिला आठवत पण नाहीये . तू खूप खुश आहे या आयुष्यात  आणि तिला या घरात सगळे तेच मिळेल जे तिला मिळायला हवे "
"आकाश , तू पण हे विसरून जा आणि खरच  मी  इराला मुलगीच मानते , विश्वास ठेव  " आई 
आई बाबा आणि आकाश काही वेळ नुसते बसून होते . आकाश म्हणाला बाहेर जावून येतो , तो बाहेर पडला पण खूप अस्वस्थ वाटत होते त्याला , इरा अवि काकाची मुलगी . त्याला आणखीनच भरून आले , अवि काका त्याला आठवत  होता आणि इराची आता खूप आठवण येत होती . कधी एकदा इरा भेतातीय असे त्याला झाले होते . पण त्याला एक वाक्य खटकले होते आईची "मुलगी मानते ", मानते म्हणजे ? मानायचे म्हणजे ती मुलगीच आहे न तिची . आई चे वागणे वाईट नाहीये , पण तरी पण चुकून कधी आपल्या बद्दल जे वाटते ते इरा बद्दल नंतर वाटेल का ? अर्थात आई नि इरा साठी खूप केलाय आणि करतीये ती आणि तिने सुद्धा अजून एका मुलाचा मोह टाळला आहेच कि . काही काळात नाहीये , उलट सुलट विचार . तो निमिष कडे गेला , पण  निमिष हि भेटला नाही . त्याला काय वाटले काय माहित तो सरळ विनीता मावशी कडे गेला . 
"अरे आकाश , या वेळी इथे ?"
"मावशी थोडा वेळ बसतो तुझ्या कडे ?"
"का रे बरे नाही वाटत आहे का ?
"नाही ग "
"मला माहितीये आकाश , तुझ्या आई चा आता फोन आला होता . तिला तुझी काळजी वाटतीय "
"मावशी , तुला सगळे माहितीये "
"हो , मला आधी पासूनच माहितीये . अवि दादा तर मला पण जवळचा होते  आणि माझ्या साठी इरा आणि तू  दोघे हि सख्खी भावंडेच आहात "
"मावशी , तू शिफ्ट  होणार आहेस का ग खरच . नको न ग जावू "
"ठरले नाही रे राजा , पण नाही जाणणार हा काळजी नको करू . मी आहे "
"मावशी , आई इरा ला तुझ्या सोबत पाठवणार होती न "
"अरे असे काही नाही , आणि मी सहज म्हणाले रे "
"पण , आई नि इराचे नाव का घेतले . का तुम्हा दोघींना पण ती आई विना पोर म्हणून कणव वाटतीय ,  प्रेम नाही "
"आकाश , असे काही नाहीये राजा . माझ्या तर मनात असे काही नाही "
"आणि आईच्या? "
"राजा , एक सांगू तिच्या पण मनात तसे काही नाही . तिचे इरा वर खूप प्रेम आहे , पण इरा अवीची मुलगी आहे हि ती नाही विसरू शकत आणि म्हणून जास्त जबादारीचे ओझे वाटते तिला कि कुणी असे म्हणून म्हणजे तुझे बाबा , आजी आजोबा यांनी कि ती कमी पडली किंवा  असे काही .  पण तुला सत्य स्वीकारणे सोपे आहे , तुला एकेच बहिण आहे , लहान पानापासून तुझे मन तिच्या वर बहिणी प्रमाणे प्रेम करताय . पण आपले मुल नसताना ते आपले म्हणून स्वीकारणे अवघड आहे . मी असे नाही म्हणत कि तुझ्या मनात ज्या शंका आहेत त्या चुकीच्या आहेत . तुझी आई माझी मैत्रीण आहे म्हणून मी सांगते कि ती इरावर प्रेम करेल , माया करेल आणि तिला तिचा हक्क पण देईल , पण त्याच वेळा हे पण सांगते कि कधी कधी ती हे नाही विसरू शकत कि तू तिचा मुलगा आहेस आणि इरा अविची मुलगी . हे सगळ खूप अवघड आहे बाळा , नात्यांचा हा गुंता , मनाचा गोंधळ . "
"मावशी , काका म्हनला म्हणून आई नि त्याचे नाव नाही लावला का ग इराला ?"
"हो आकाश , तुझा काका खूप हुशार आणि दूरदर्शी होता , जरी तुझे आई बाबा इराला प्रेम देतील हे माहित असले  तरी , इरा ला पण ते काका काकू आहेत हे कळेल तर ती त्यांच्याशी कशी वागेल असे हि वाटले त्याला . तुम्हा मुल पण कदाचित मोठे झाल्यावर कसे वागाल , एकमेकांशी कसे नाते संबध ठेवाल  असे वाटले त्याला  . ज्या कारणाने मुळात भांडणे होतील तेच अवि दादांनी टाळले. तू लहान आहेस अजून  , पुढे दुनिया दारी मध्ये  काय काय अनुभव येतात अरे . सख्खे  काय आणि चुलत काय "
"मावशी , मला कळातच नही ग , म्हणजे मला भीती वाटतीये कि मी कधी चुकून इरा शी , तिला कळेल असे वागणार नाही न , मला स्वताची आणि तिची खूप काळजी वाटतीये "
"आकाश , मी एक सांगू . विचार नको करू . फक्त एक कर , इराचा भाऊ आणि मित्र आहेस न , मग तसाच राहा . जस्ट बी  हर ब्रदर , लव हर ."
"मावशी , किती सोपे केलेस ग तू हे :)"
आकाश नि ठरवले कि मी इराचा भाऊ , मित्र आणि …आणि  मी आज पासून तिचं साठी अवि काका सुधा होईन . इरा आणि आजी परत आल्या , इरली काही कळले नाही आणि कळणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली . एक दिवस मात्र , आकाश आजी जवळ खूप रडला , आजी ला त्याने सांगितले कि तो आयुष्यात इरा ला कधीच अंतर देणार नाही , तिचे सगळे त्याच मायेने करेन जे त्याने भाऊ म्हणून करायला हवे आणि तितकच लाड करेन जे अवि काकांनी केले असते . आजी त्याला इतकाच म्हणाली कि  आकाश तू हे तर करच , पण तुझ्या आई ला समजून घे ती मनानी मोठी आहे पण शेवटी माणूस आहे , कधी कधी आपल्या मुलाचा मोह पडला तर , तिला समजून घे आणि  जाणीव करून दे तिला लगेच समजेल . तिचे पण इरा वर खूप प्रेम आहे 
आकाश वर्तमानात आला , आणि त्याला क्षणभर असे वाटले कि मधली सगळी वर्षे गळून पडली आहेत .  खरी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे , निमिष  च्या घरी पण . कधी तरी नंतर चुकून समजलाच तर गैरसमज नकोत म्हणून हि काळजी घेतली होती आई बाबा नि , पण हे चांगलाच झाले . हाच विचार करून आजीने अनु आणि तिच्या घरी सांगितले , पण तेव्हा   मात्र आमचे अंदाज चुकले . अर्थात बराच झाले म्हणा , लग्ना आधीच काय होते ते स्पष्ट झाले होते 
फोन च्या रिंग नि आकाश ची विचार शृंखला तुटली 
"हेलो , मी निमिष बोलतोय "
"हा बोल रे , काय विशेष ? कुणासाठी फोन केला आहेस नक्की "
"अरे , काही नाही सहजच . खर तर तुझ्या साठीच .  तू लग्न झाल्यावर २-३ दिवसात खरच परत जाणारेस ?"
"बातमी पोचली का तुझ्या पर्यंत , हो जाणारे म्हणजे सध्या तरी जायला हवे , बघू मग काय ठरतंय ते "
"मला वाटतंय मित्रा कि आता परत ये, खरच .  आम्हाला सगळ्यांना तू इथे हवा आहेस  अरे कमीत कमी मी इरा ची काळजी घेतो कि नाही  वॉच  ठेवायला तरी ये "
" नक्की , विचार करेन. झाली का तयारी सगळी   "
"सुरु आहे रे हळू हळू . तू बारा आहेस न "
"हो "
"बर मग ठेवतो "
"चालेल "
निमिष नि जसे समजून घेतले तसे अनु का नाही समजून घेवू शकली  , एकाच सत्यावर  वर माणसे  किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात  , विचार करतात . अनुला कळले मात्र कि इरा चुलत बहिण आहे , तिचा दृष्टी कोनच बदलला . जे काही आहे ते आपलाच आहे , तसाही तिला हॉस्पिटल मध्ये कुणी तिच्या पेक्षा वरचढ नकोच होते , अधिकाराने आणि कर्तृत्वाने सुद्धा आणि जेव्हा तिच्या लक्षात आले कि , इरा ला आम्ही इतक्या  केले तेव्हा तर तिने आई ला हेच पटवून दिले कि जे तुम्ही केले ते फारच काही तरी दिव्य आहे आणि जणू इरा वर उपकारच केले आहेत . 
त्याला त्याचे आणि अनुचे शेवटचे बोलणे आठवले 
"आकाश , तुझे मला पटत नाहीये , तू खरच परदेशी जाणार आहेस "
"हो , १ वर्षभर तर जावे लागेल "
"पण , मग मी काय करू इथे ?"
"तू , हॉस्पिटल सांभाळ न , नाही तर चाल माझ्या सोबत , एक वर्ष पण नाही , ६ महिन्याचा प्रश्न आहे "
"मला नाही जमणार , दोन्ही इथे तुला सोडून राहणे किंवा तुझ्या सोबत येणे "
"का ग ? तुला भीती वाटतीय का ?"
"कसली भीती ?"
"हेच कि तुझे इथले महत्व कमी होईल "
"म्हणजे ?"
"अनु मशुअ सगळे लक्षात येतेय . इरा माझी सख्खी  बहिण तर आहेच पण  एक सांगतो हे सगळे तीचेच आहे . तुला काय माहित ग आमच्या घराबद्दल "
"मी असे काही कधीच म्ह्नाले नाहीये "
"मी ऐकले आहे , तुझे आणि आईचे बोलणे आणि मगच बोलतोय . तू का आई ला हे पटवून देतीयेस कि इरा आज न उद्या या घरातुन लग्न होवून जाणार आहे , आणि हि हक्काची भाषा नव्हती आमच्या मनात . तुअल बरोबर कळले कि आई ला तू पटवू शकतेस "
"हे बघ आकाश , मी काय इरा ला घराबाहेर काढा असे नाही म्हणाले , पण शेवटी जे काय मिळवले आहे  ते तुझ्या आई बाबांनी च न . आणि इरा बद्दल सगळी कर्त्य्व्ये करत आहेत कि ते . जर मला तुला तुझे मिलावसे वाटले तर काय चुकीचे आहे , आणि समज तू डॉक्टर झाला असतास तर . आणि तसे हि इरा म्हणत्ये न कि ती हॉस्पिटल मध्ये काम करेल नाही तर बाहेर  सुद्धा जाईल एखादे वेळेस . तू उगाच गैर समाज करून घेतला आहेस . आणि तसे पण इरा अजून शिकतीये . ती आई वडील  नसून सुद्धा तिला कुटुंब मिळाले आहे . तू उलट तुझ्या आईचे आभार मानायला हवे आहेस "
"अनु , जास्त बोलातीयेस . तुला काय माहित ग , अवि काका बद्दल आणि आमच्या घराबद्दल . हे जे तुला  सासू ग्रेट वाटतीय न , ती आज डॉक्टर आहे कारण अवि काका होता , तो होता म्हणून तिचे माझ्या बाबाशी  लग्न झाले आणि माझ्या आजी आजोबा नि उभे केलेला हा डोलारा अवि काकांनी नवा रुपाला आणला त्याच्या सुरवातीच्या काळात . आई बाबा जो पर्यंत सक्षम होत नाहीत तो पर्यंत सगळे सेट करून ठेवले त्याने इथे आणि मग कसलाही मोह न ठेवता तो निघून गेला . त्याने इरा ला पण आई कडे त्याच विश्वासाने दिले, स्वताचे नाव मागे ठेवण्याचा मोह पण ठेवला  नाही ग त्याने . त्याला हेच नको होते , कि इरा कडे कुणी असे पाहावे . त्याला माझ्या आई बद्दल खात्री होती , पण  आम्ही मुले मोठी झाल्यावर कशी वागू या विचाराने त्याने हा मोह टाळला . आणि ऐक माझ्या आई ने जे केले ते फक्त कर्त्यव्य म्हणून नाही . आणि इरा पण अवि काकाची मुलगी आहे हि तिने नकळत दाखवून दिले , माझ्या प्रेम खातर तिने तू म्हणशील ते ऐकले , कसलाच मोह न ठेवता . रूम शिफ्ट केली , तुला जे जे आवडेल ते देवून टाकले . तिने तुला आपले मानले आणि तू ?"
"आकाश , मला आरोपी करू नकोस , मी बाहेरची आहे म्हणून आरोपि. मग हेच प्रश्न तुझ्या आई ला विचार कि जे मला विचारात आहेस . त्यांना का पटत होते मग माझे आणि इराचे काय , तिला जेव्हा कळेल तेव्हा ती मागेल्च कि 
 हक्क , बघू तेव्हा पण ती तुझ्या वर इतकाच प्रेम करते का आणि सोडून देईल का तिचा हक्क तुझ्या साठी "
"अनु , तू असा इतका कडवट विचार करत असह्सील असे मला वाटत नव्हते . म्हणजे आपण सुखात राहावे , यशस्वी असे प्रत्येकाला वाटते , आणि तसे होईल इतके आहे आपल्या कडे , पैसा , बुद्धी आणि संधी सुद्धा . आणि स्पष्टच सांगतो , माझ्या आई ला जेव्हा आरोपीच्या पिंजर्यात उभे करायचे हे माहितीये मला , तू सांगायची गरज नाहीये . हो एखादे वेळी तिला तुझे पटले पण असेल , पण इरा २ महीन्याची असल्या पासून सगळे केलेय तिने  इराचे आणि इरा साठी स्वताच्या अजून एका मुलाचा मोह टाळला आहे तिने , कमीत कमी तो एक मोठा त्याग आहे तिच्या नावावर , ज्या साठी मी तिला हजार  वेळा माफ करेन , कळले . तू हे सगळे डोक्या तून काढून टाक . आपण एक वर्षभर बाहेर जावून येवू किमान सहा महिने , सगळे ठीक होईल मग "
"आकाश , एक मिनिट . एक तर माझे काही चुकले आहे असे मला नाही वाटत . अगदी वेळ आली तर इरा ला तिची वाटणी मिळेलच कि , तू का घाबरतोस . आणि तिला कळेल न तेव्हा तीच मागेल बघ "
"अनु , आता शेवटचे ऐक , जे काही आहे ते तिच्या बाबाचे म्हणजे अवि काकाचे च आहे , उलट तो काही न घेत गेला , त्यांनीच माझ्या आई बाबाला , विशेषत: आई ला दिलाय सगळे जे त्याचे आणि नंतर इराचे आहे . माझाच काही नाहीये त्यात , कळले . आणि एक इरा ला हे कुणी हि सांगणार नाहीये कधीच , आमच ठरले आहे तसे , सगळ्यांचे "
"तुमचे ठरलाय न , मी माहिये त्यात . अनु मला असे वाटते कि लगेच असे नाही , पण कधी तरी इरा ला सत्य कळायलाच हवे . तिला पण कळू दे कि ते , तिला असे न सांगणे हा तिच्या वर आणि तिच्या आई वडिलांवर अन्याय आहे "
"अनु , तू न्याय आणि अन्यायाची भाषा नको करूस . हे तू तिला सांगणार नाहीयेस .  कधीच . आणि जर तू हे करणार असशील , आणि तुझ्या डोक्यातून हे सारे जाणार नसेल तर …।"
"तर काय , आकाश , आणि मी तुला सांगतीय कि माझे काय इरा शी वैर नाहीये , पण सत्य कडे पाठ  जागल तुम्ही लोक , आणि एक तू कुठे हि जाणार नाहीयेस , आपण इथेच राहतोय , तुझे परदेशी जाणार तू डोक्यातून काढून तक "
"इरा माझी बहिण आहे आणि हेच सत्य आहे , त्य्झासाठी नसले तरी , मी राहीन ते च सत्य स्वीकारून आयुष्य भर , आणि ते पण आनंदात . आणि आपण जातोय कमीत कमी ६ महिने तरी  आणि मला वाचन दे कि तू इरा ला कधीच काही सांगणार नाहीस "
"वचन वगैरे काय , कोणत्या जमान्यात जगता रे तुम्ही लोक , उद्या काय प्रसंग येतील काय माहित . कमीत कमी तिचे लग्न होईल तेव्हा तिच्या होणाऱ्या  साथीदाराला तरी सांगणार न तुम्ही , मला सांगितले तसे , हे सत्य . मग तेव्हा तर तिला कळेलच कि , मग या वचनाचा काय उपयोग . आणि लक्षात ठेव तिला जर कुणाकडून कळले किंवा तेव्हा  कळले न तर तिला वाटेल तू तिचा विश्वास घात केलाय , आणि ती बघ तुझा राग राग करेल "
"अनु , तू काहीही उगाच माझ्या मनात भरवू नकोस, हे बघ तुला माझे म्हणणे मान्य आहे कि नाही  तेवढे संग ते सांग :
"नाही मान्य आहे , दोन्ही म्हणणे , इरा ला आज न उद्या सत्य सांगावे लागेलच आणि वेळ आली तर मीच सांगेन आणि दुसरे म्हणजे मला परदेशी नाही यायचे आहे , तू मी तुला जावू देईन "
"ठीक आहे तर , मग हेच जर तुझे ठरले असेल तर , आपले  झालेले बरे "
"आकाश , हे काय बोलतोयस तू , पंधरा वीस दिअव्स वर लग्न आहे आपले आणि तू ,… "
"माझ्या समोर  तू दुसरा काही पर्याय ठेवला नाहीयेस "
"मी ठेवला नाहीये ?, आकाश तूच जागा हो , ज्या इरा साठी तू मला नाही म्हणतोयेस न , तीच एक दिवस तुझ्या कडे पाठ फिरवेल कि नाही बघ , खरे कळल्यावर . अरे सख्खी  भावंडे जिथे आपापल्या संसारात अडकल्यावर   , एकमेकांना नकळत पाठ फिरवतात तिथे बाकीच्यांचं काय ?"
" अनु , भविष्यात नशिबाने काय वाढून ठेवले आहे मला नाही माहित , पण आज काय करायचे तेच  फक्त माझ्या हातात आहे . आणि आता मला नाही वाटत कि आपण एकत्र  राहू शकू , माया आणि तुझ्या विचारातच फरक आहे . कदाचित तू तुझ्या जागी बरोबर असशील हि , पण मी नाही अश्या विचारण सोबत राहू शकत . "
"आकाश अ, तू  आहेस मला , मी तुला आणि मुख्य म्हणजे इअर ला कधीच माफ नाही करणार . तुम्ही काय स्वताला जागा वेगळे समजता  का रे ? तुमचे ते प्रेम आणि आम्ही काय ? मी पण प्रेम केलेच तुझ्या वर पण , तुला कळलच नाही "
"अनु , आम्ही जगावेगळे नसू हि पण कदाचित , पण आमच्यात हे ऋणानुबंध नियतीनी जोडले आहेत , मला जेव्हा काही माहित नव्हते न तेव्हा पासूनच मी  आणि इरा  इतके जवळ आहोत ,  आमचे नाते आमच्या पुरते आहे आणि ते कुणी समजावून घेतले नाही तरी चालेल , पण कमीत कमी त्याचा आदर करावा इतकीच माझी अपेक्षा होती . आणि प्रेमाचे म्हणशील तर तू केले असशील माझ्या वर प्रेम , मी नाकारत नाही . मी स्वीकारले पण होते . पण तू जर माझ्या इरा बद्दलच्या भवनाचा आदर केला असतास तर कदाचित मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार . जावू दे , आपण हे जुळवू नाही शकत आता , मला माफ कर , आपण इथेच थांबू . आणि एक कारण विचारले तर हेच माझ्या परदेशी जाण्याचे सांगू , जर माझ्यावर प्रेम केले असशील तर इतक ऐक माझे . प्लीज "
"ठीक आहे आकाश , तू तुझ्या घरी आणि माझ्या घरी पण तूच सांग . पण एक सांगू आयुष्य असे एका नाट्य साठी कधीच थांबू शकत नाही . माझे पण नाही आणि तुझे पण आणि इराचे पण . एकटे जगणे अवघड आहे , तू एकटा पडशील आज न उद्या  "
"अनु , प्लीज . "
अनु निघून  गेली नि आकशा एकटाच मागे राहिला , आपण हे असे करायचे ठरवून आले नव्हतो . अनु ला केवळ   होता . दोघानीच काही दिवस परदेशी राहणे , तिला आवडेल असे वाटले होते आणि त्यामुळे   सगळे व्यवस्थित होईल असे वाटले होते , पण काही तरी भलतेच झाले . आता हे सगळ्यांना सांगयचे म्हणजे आणि इरा ला काय सांगू , तिला तर धक्काच बसेल . आई बाबा तरी समजावून घेतील का 
आकाश घरी आला  तर , घरी आधीच बातमी लागली होती , अनुच फोन येवून गेला होता . 
"आकाश , आम्हाला तुझ्या सोबत बोलायचे आहे . इरा बेटा  तू थोडा वेळ विनीता कडे जा "
"आई , पण मला एकदा दादू शी बोलू दे न ग "
"बरे ठीक आहे , तू बोल त्याचाशी अन जा मग . "
"म थाबते न ग आई , प्लीज "
"इरा , तू थाब्लीस तर हरकत नाही , पण तू अजून लहान आहेस बेटा "
"ठीक आहे आई , पण दादू काही चुकीचे करणार नाही ग , त्याचे ऐकून तरी घे "
"इरा , आम्ही शांत पणे  बोलू  "
"दादू , तू खरेच परदेशी जातोयेस का रे ? जाने गरजेचे आहे का ? नंतर जा न ? लग्न करून काही दिवसांनी . नाही तर काही वर्षांनी जा . अनु खूप गोड मुलगी आहे  रे , ती आणि तू मस्त आहात आणि आई ला पण ती किती आवडते न आणि मला पण "
"इरा , राजा तू काळजी नको करू . बघू काय होते ते . आणि माझ्या वर विश्वास ठेव ग तू , जे काही होईल त्यात आपले सगळ्यांचे भले आहे "- आकाश 
"माझा विश्वास आहे रे तुझ्या वर , तू चुकीचे काहीच करणार नाहीस . मी जाते , पण मी परत येयीन तेव्हा सगळे आनंदी झालेले असू दे . मला फोन करा "
"इरा, निघ तू , मी फोने करते तुला "- आई 
इरा गेली आणि आकाश अजूनच एकटाच पडला 
"आकाश ,  हा काय वेडेपणा आहे "- आई 
"वेडेपणा काय आहे त्यात अ, हे बघ मी काय असे ठरवून गेलेओ नव्हतो . पण तिचे बोलणच असे काही होते कि माझ्या समोर दुसरा पर्याय नव्हता "
"आकाश , अरे फक्त काही दिवसांवर लग्न आहे आणि आता तू म्हणतोयेस कि , त्या लोकांचा तरी विचार कर :- बाबा 
"बाबा , एक विचारू तुला , अनु वर विश्वास आहे आणि माझ्यावर नाही"
"असे नाहीये आकाश , पण तुमचे वायाच असे काही , माणूस टोकाचा विचार करतो एकदम . तू काय किंवा अनु काय . आम्ही मोठ्या माणसांनी मध्ये पडायला हवे न . इतके  महत्वाचे निर्णय तुम्ही आपापले घेवून कसे चालेल "
"आई , एक वेळ मी परदेशी नाही जाणार , पण अनु नि इरा ला काही सांगायचे नाही असा शब्द तर दिलाच नाही पण उलट तिला सांगणे गरजेचे आहे हे मला पटवून देत होती , ती कधी तरी इरा ला सांगेल या  दडपण खाली  खाली मला आयुष्य भर जगायचे नाहीये . अनु वाईट नाहीये , पण महत्व कांक्षी तर नक्कीच आहे , तिला जे हवे आहे ते मिळवण्या साठी ती गोष्टीचा उपयोग जर आयुष्य भर करत राहील , तर आमचे नाते फुलेल का ? त्यातून केवळ आनंद मिळेल का आई ? तूच सांग ?"
"अरे असे काही नाहीये, अरे या वयात असे वाटते , आपल्याला सगळे यश , पैसा , प्रसिद्धी , मन सगळे मिळावे म्हणून . हळू हळू आपण मोठे होते आणि  बदल होतात "
"मान्य आहे आहे कि माणूस वय वाढेल तसा ,बदलतो  पण तरी त्याचे मुल स्वभाव नाही बदलत आणि मुख्य म्हणेज मी तिला म्हणताच नाहीये कि माझ्या इतके प्रेम तिने इरा वर करावे . फक्त माझ्या भावनांचा आदर करावा . मला असे वाटले होते कि आम्ही थोडा काळ जर बाजूल अराहू , तर आमचे नाते रुजेल आणि तिच्या मनातले हे सगळे जर बाजूला पडेल . पण तिला काही मान्यच नाहीये . बर इथेच राहायचे म्हंटले , तर तिच्या आजच्या बोलण्यावरून इरा ला कधी कधी तिच्या वागण्यातून काही तरी जाणवेल याची मला भीती वाटतीये . अनु ची तेवढी क्षमता  नाहीये ऐं . खर तर तूच तिच्या विचारणा खात पाणी घातलास . तुझी पण चूक आहे . तू का नाही तिला ठणकावून सांगितले . ती बोलली आणि तुला पटले . मला वाटतय कि विनीता मावशी सोबत तुझे या वरूनच वाढद झाले आणि तिने हॉस्पिटल मध्ये लक्ष काढून घेतले . आता मला लक्षात येतेय सारे . हे असे इराला रूम शिफ्ट करायला लावणे, इर्रीन्ग्स घेणे ,हॉस्पिटल मध्ये आपले महत्व वाढवण्याचे प्रयत्न आणि आई तू हे सगळे ऐकलस . मी इथे नव्हतो , तू का इराला सांगितले नाही कि रूम बदलायची नाही आणि अनु ला पण तेव्हाच समाज दिली असतीस तर बरे झाले असते . तू माहित असून दुर्लक्ष केलेस  अनु बाहेरची आहे , पण तू , तू तर आमची आहेस न , मग "
"आकाश , तू आई शी असे बोलू शकत नाहीस "- बाबा 
"खरेय , आईशी च का , तुम्ही पण तर होता कि इथेच . तुम्ही तर कधीच कशात लक्ष घालत नाही . म्हणजे प्रश्नच नको , समजा जर आई चुकत असेल , तर तुम्ही तिला का नाही सांगितले . इराच्या जबाबदारीचे ओझे जितके आई वर आहे , तितके तुम्ही कधीच घेतले नाहीत . जबादारी नको , म्हणून निर्णय  नको , आपण आणि आपले हॉस्पिटल बस . निर्णय सगळे आजी आणि आई कडे "
"आकाश , बस . खूप बोलला आहेस . आम्ही ऐकून घेतोय म्हणून . तू काय आम्हाला प्रश्न विचारणार का रे आता ? आई वडील आहोत आम्ही तुझे "
"आणि विसरू नको आई , इराचे पण आहात "
"ते आम्ही नाही विसरलोय आकाश , मी हि नाही आणि तुझे बाबा पण नाही . तूच पूर्व ग्रहणे बघ्तोयेस आमच्या कडे . इराचे लय कमी केलेय किंवा करतोय रे आम्ही का तू एकट्यानेच मक्ता घेतला आहेस तिचा . अनु घरात नवीन येणार होती म्हणून चार गोष्टी तिच्या मनासारख्या केल्या तर काय बिघडले आणि इरा सख्खी  बहिण असती तर जशी वागली असती तशीच  वागली म्हणून मी काही नाही बोलले . "
"पण , अनु तशी वागत नव्हती न , तिने लगेच वागणे बदलले , ते नाही दिसले तुला "
"हो दिसले , पण मला इतके काही वाटले नाही त्यात . आणि तसाही मी आणि तुझे बाबा समर्थ आहोत इराची काळजी  घायला . तुला आणि अनु ला यात पडायचे कारण नाही. आम्ही अवि दादांना वाचन दिले होते , आमचे माही बघून घेवू . आणि एक आता आपण अनु कडे जातोय आणि सगळे सुरळीत करू  . माफी मागा  , दोघे एकमेकांची आणि मोठ्या मनानी एकत्र या परत . "
"आई , ते शक्य नाही . ती किती कडवट विचार करते, ते काळात नाहीये का तुला . आणि मला नकोय हि अशी मुलगी आयुष्यात . ती इराला नक्की सांगेल एखादे दिवशी नाही तर मला तलवारीच्या टोकावर धरेल आयुष्य भर . भांडणे च होतील यातून , मनस्ताप होईल तिला पण आणि मला पण , कशाला हा अट्टाहास ."
"आकाश , अरे कोणतीही मुलगी तुझ्या आयुष्यात आली तरी हे असे होणारच , तू असा किती काळ  एकटाच राहणार आणि आज न उद्या इरा ला पण साथीदार मिळेलच कि तिचा , मग ?"
"तेव्हाचे तेव्हा बघू , मला समजून घेणारी अशी एखादी मुलगी असेल कि , तिह्याशी लग्न करेन मी , पण आत अनु शी नाही . आता लगेच मला हा विचारच नकोय .  प्लीज "
"आणि इराला काय सांगशील आकाश ?"- बाबा 
"सांगेन जे सगळ्यांना सांगितलाय तेच , परदेशी जाण्य वरून मतभेद झाले म्हणून आणि अनुचे म्हणाला तर ती खूप प्रक्टिकल आहे , she will move on easily . "
"इतके सोपे नाहीये आकाश , खेळ नाहीये हा , मनात आला मांडला आणि मनात आले मोडला . आम्ही इतके दिवस तुम्हाला मोकळीक दिली हेच चुकले , लगेच लग्न झाले असते  तर बरे झाले असते . हि नसती भानगड "
"आई , इतके सगळे सांगतोय मी तुला अनु बद्दल आणि तरी पण ,… तू तरी मला समजावून घेशील असे वाटले होते आणि लग्न होनी आधीच झाले हे बरे झाले उलट . कधी कधी अशी नाती तुटतात हेच चांगले आहे . मी शेवटचे सांगतोय मी  हे लग्न मोडलाय , मला काही नाही बोलायचे यावर "
"आकाश ,आताताई पण करू नको , शांतपणे  विचार कर . आम्ही जातोय अनु कडे , आणि लग्न होईल त्याच तारखेला कळले .  माझा शब्द अखेरचा आहे . आणि इरा आमची जबादारी आहे , ते ओझे तू उचलू नकोस "
"आई , मग माझे पण ऐक , मी हे लग्न करणार नाही हा माझा पण शब्द आहे , आणि आता खरच आता तुम्हीच इराची जबाबदारी पार पाडा . मी तसाही पुढच्या महिन्यात परदेशी जाणार होतो , ते नक्की आहे. "
"आकाश , तू  तसा लहान आहेस अजून  .  पूर्ण आयुष्य आहे तुझ्या समोर आणि हा काय वेडेपणा आहे .  किती समजवायचे  रे तुला . आज अवि दादा असता तर , आणि इरा त्याचीच मुलगी असती तर हे असे काय सगळे घडलच नसते . त्या पोरीच्या नशिबात काय आहे कुणास ठावूक , आई गेली , वडील गेले आणि आता तिच्यामुळे  तू लग्न मोडतोयेस , त्या पोरीला जर चुकून कळले तर काय वाटेल तिला , याचा तरी विचार कर . " 
"आई एक तर , इराला मध्ये घेवून दोष तिच्या माथी मारू नकओ , आणि तिला हे कधीच कळणार. तिच्या शी तुम्ही नका बोलू मी सांगेन  काय असेल ते आणि अवि काका जगाला असते तर बरे झाले असते असे वाटायला लागलाय मला आता . त्याला जर कळले असते न कि तुम्हाला इतके ओझे वाटतय , तर जगाला असता बिचारा , आपल्या पोरी साठी "
"आकाश , इतके वाईट आहोत का  रे आम्ही , काय असे कमी केलाय रे आम्ही तिचे आणि तू काय असे करणार आहेस वेगळे . तुला नाहीच कळणार , आई बाप होणे किती  अवघड आहे ते  पण "
"ते पण काय , एका  अनाथ मुलीचे हेच न . ऐक मग ती अनाथ कधीच नव्हती , हे जे सगळे आहे न तिचेच आहे हक्काचे , आपण सगळ्यांनी फक्त सांभाळले इतकाच , आणि आता तुम्हीच तिची काळजी घ्या कारण मी वर्ष भर तरी नाहीये इथे . "
इरा संध्याकाळी उशीरच आली , घरात सगळे सामसूम होती . ती आकाशाच्या रूम मध्ये गेली 
"दादू , तुझे हे नक्की आहे , तू लग्न नाही करत आहेस  "
"हो नक्की आहे आणि ऐक इरा पुढच्या महिन्यात मी जातोय एक वर्ष  साठी "
"आणि मी ? एकटी राहू इथे "
"एकटी का बाळा , आई आहे  बाबा आहेत , मावशी आहे ,निमिष आहे .  हा आत आजी नाहीये , पण हे सगळे आहेत कि . आणि आपण तर टच  मध्ये राहूच कि . आणि सुट्टीत तू तिकडे ये आणि मी  तरी . वर्षभर  जाईल बघ पटकन "
"पण तू लागा का मोडलास , मला तुझे कारण नाही पटले , नक्की काय झालाय ?"
"तेच कारण आहे इरा , माझ्या वर विश्वास ठेव . हा विषय थांबवू आपण इथेच . आणि मी जर वेळ निम्सिः कडे जावून येतो हा "
इरा ला खरे तर पटतच नव्हते , आई बाबा पण तेच  सांगत आहेत . आई ला आकाश चे वागणे पटले नव्हते , आणि परदेशी जाने तर अजिबातच . वाईट ह्याचे वाटत होते कि त्याने जणू आरोपात्रच दाखल केले होते तिच्यावर आणि बाबावर सुद्धा . हि अशीच कटुता मनात राहिली आणि आकाश परदेशी गेला . एक  वर्षे झाले तरी परत यायची चिन्हे नव्हती ,  इरा डॉक्टर झाली , हॉस्पिटलचे काम बघू लागली , पुढचे शिक्षण पण सुरु झाले , त्याला जाणवत होते कि आई बाबा आणि ती आता जास्त जवळ आले आहेत , त्याचा पासून दुरावालेले  तीनही जीव एकमेकांना आधार देत जगात आहेत ,, आणि म्हणून आकाश नि तिअक्दे राहणे वाढवले . पण या मध्ये त्याचे आणि आई बाबा मधले  वाढतच राहिले . तो कडवट पण अजून तसाच  होता . चू होती पण कुणाची , आणि माफ मागायची तर कुणी . या सगळ्या काळात हे कुटुंब जोडून ठेवले ते इरा नि  . आई बाबा नि विचारले नाही तरी  आकाश चे सागेल तपशील ती त्यांना सांगायची , त्यांचे सगळे आकाशाला सांगायची . निमिष नि मात्र आकाशाला वाचन दिल्या प्रमाणे , इराला आणि आई बाबान हि लागेल ती मदत केली होती .  हसत खेळत ठेवण्यात त्याचा खूप मोठा  हात होता . जी इरा त्याला छोटीशी बाहुली वाटत होती , त्याच बाहुलीच्या प्रेमात तो पडला होता , अगदी सहज , नकळत आणि त्याला हा  खरा भातुकलीचा डाव तिच्या सोबत मांडायचा होता , पण आकशा नि अनुचे असे झाल्या पासून त्याला जाणवत होते कि इरा हे सगळे टाळतिये. तिला मी आवडत असलो तरी , तिला ते मान्य होत नाहीये . आकाश  सेटल होवू दे , मग मी विचार करेन असे तिने नकळत त्याला सांगितले होते . आत फक्त आकाशच होता जो तिला समजावू शकत होता . आणि आकाश नीच तिला  लग्नाला तयार केले आणि इथे आला तिच्या हट्टा  साठी . 
 बघता बघता इराचे लग्न पार पडले , ते पण अगदी विनाविघ्न . इरा नि अगदी हुशारीने आकशा कडून एक वचन घेतले कि तू पुढच्या ६ महिन्यात परत येयील . आणि त्याला ते द्यावाच लागले . आकाशाचा जायचा दिवस येवून ठेपला . पण तो परत येणार असल्यामूळे  सारेच खुश होते . इरा आणि निमिष दोघे त्याला सोडायला जाणार होते . आकाश परत येवून त्याच्या जुन्या सहकार्यांना जोइन करणार होता . 
आकाश , इरा आणि निमिष तिघे विमान तळावर होते , आपापल्या विचारात 
निमिष खुश होता , त्याचा मित्र परत येत होता आणि त्याचे प्रेम त्याला मिळाले होते . आकाश पण आनंदात होता , त्याच्या लाडक्या इराला तिचा  जोडीदार मिळाला होता आणि तो पण निमिष , म्हणजे  काळजीच मिटली , आणि मुख्य म्हणजे इरा तितकीच जवळ राहणार होती त्याच्या आता . निमिशनी तिच्या प्रेमात पडावे याच्या इतके छान काहीच नवते . आणि इरा , ती खुश होती कारण निमिष सोबत लग्न झाले म्हणून , या हि पेक्षा आकाश परत येणार म्हणून आणि त्या हि पेक्षा आई बाबा आणि आकाश एकतर आले म्हणून . 
"निमिष , मी येतोय लक्ष ठेवायला तुझ्या वर . इरा कुठाय रे ?"
"अरे ती फोन वर बोलतीये "
"मित्र खरे सांगू , खूप हलके वाटतय  रे मला . आपल्या माणसात आल्यावर खूप बरे वाटतंय . ६ महिन्याच्या आतच मी येयीन इथे . इरा मुळे  मी आणि आई बाबा एकत्र आलोय . आणि छान काय आहे माहितीये , आम्हा दोघांना समजून घेणारा तू आहेस तिच्या आयुष्यात "
"काळजी करू नको आकाश,इराला मी कधीच काही नाही सांगणार नाही "
"काय रे माझ्या बद्दल  काय बोलताय तुम्ही "
"काही नाही , तू चिडलीस कि काय करायचे ते सांगतोय ग तुझ्या निमिषाला "
"असू दे . निघ तूं आता , वेळ झाली बघ . आणि बोलूच आपण , आणि ये परत लवकर मी खूप वाट बघतोये आणि मी रडायच्या आत पळ "
"इरा … काळजी घे , मी येतोच आहे "
निरोप छोट्या काळासाठी असेल तरी तो घेणे जड जाताच नाही का 
"इरा , तू रडतीयेस. अग  तो येयील परत  "- निमिष 
"नाही रडत नाहीये मी . एक सांगू तुला , फक्त तुझ्या आणि माझ्यात च. आज मला खूप बरे वाटतय , आकाश परत येतोय , आई बाबा आणि तो आता परत एकत्र येतील . आणि सगळे छान होईल . आज तो मनावरचे एक ओझे कमी करून गेला आहे आणि मी पण एक ओझे कमी केलाय . माझ्यामुळेच ५ वर्ष पूर्वी सगळे घडले . आई बाबा दुरावले त्याला आणि अनु पण गेली त्याच्या आयुष्य मधून  "
"इरा , असे काही नाहीये , तुझा काय संबध "
"माझ्या काय संबध ते मलाही माहितीये आणि तुला हि न निमिष "
"म्हणजे "
"मला सगळे कळले आहे , माझ्या बद्दल कि मी , म्हणजे माझे बाबा म्हणजे आकाश चे अवि काका आणि आकशा माझा … खर  तर तो माझा सगळे काही आहे . भाऊ , मित्र  , आणि बराच काही . "
"इरा पण तुला हे सगळे कसे कळले आणि कधी आणि माहित असून हि तू कुणालाच का नाही  ?"
" आकाश गेला खरा , पण १ वर्षे झाले आणि अनु अचानक भेटली , तिचे लग्नाचे परत बघत होते . मला राहवले नाही , मी तिला विचारले काय झाले ते . ती म्हणाली तुझ्या भावालाच विचार . मी खूप हट्टाला पेटले , जेव्हा मी तिला म्हणाले कि तुझ्या मुळे  आकाश आम्हाला दुरावला तेव्हा तुला मला खरे सांगावेच लागेल तेव्हा मात्र ती म्हणाली कि माझ्या मुळे … सगळे … माझा विश्वास बसे न , मग विनीता मावशीला विश्वासात घेतले आणि तिच्या पाशी बोलले मी कारण मला आई बाबा , हो आई बाबच आहेत ते माझे ,  दिला तरी । त्यांना मला दुखवायचे नव्हते अजून आणि आकाशाला तर नाहीच नाही . मग मावशीला म्हंटले कि मला कळले आहे हे त्यांना सांगू नको . त्यांनी जे जीवापाड जपले . केवळ माझ्या साठी ते जपल्याचे समाधान  आणि सुख मला हिरावून नाही घायचे आहे कधीच . काही गोष्टींच्या न कळलेल्या चांगलाय नाही का !. आणि खर सांगू , अरे ज्यांनी मला जन्म दिला ते मला आठवत हि नाहीयेत , मला आईचा स्पर्श आठवतो तो या आईचाच , बाबांचा आधार वाटला तर याचा बाबांचा आणि कुटुंब आकाश शिवाय कसे पूर्ण होईल माझे . हेच माझे कुटुंब आहे . ते आयुष्यभर धापडत राहिले , मला सत्य कळू नये म्हणून , कारण त्यातच हित होते माझे आणि त्यांचे पण आणि मला आता हि कसरत आयुष्यभर  करायची आहे :) , प्रत्येक जण  आयुष्यात आपले असे काही   घेवून येतो आणि  आपल्या माणसासाठी जर कहे ओझे उचलावे लागले तर ते उचलण्याचा एक आनंद असतोच कि , आणि आत माझी turn आहे न . आणि मला यात मदत कर , जर कधी मी कमजोर पडले चुकले तर , तू माझा कान पकडून मला आठवण करून दे . मी खूप नशीबवान आहे कि इतके प्रेम करणारी माणसे  माझ्या अवती भोवती आहेत . आणि खरे सांगू आईचे प्रेम आहे रे माझ्यावर ,नेहमीच होते . आकशाला हि कळेल तिची बाजू एक दिवस. ती जर कधी चुकली असेल तर आम्ही तिला समजावून घ्याला हवे, कारण आमच्या फार चुका पोटात घातल्या आहेत तिने . "
"इरा , मी आहेच ग , पण तुझे कौतुक वाटते मला . आणि तुला हे माहित असूनही …. "
"जे होते  ते चांगल्या साठीच . तुला एक गम्मत सांगू ."
"काय ग ?"
हे माझे रहस्य माहित असलेली अजून एक व्यक्ती आहे , जी आकाश सोबत परत येणार आहे आणि हे आकशाला  पण माहिती नाहीये . तुला काय वाटले तू एकटाच आहेस का समजूतदार या जगात जोडीदार म्हणून "
"म्हणजे ?"
"म्हणेज काय ?  आयुष्य सोपे आहे . त्रिकोणा  पेक्षा चौकोन चांगला नाही का ?"
इरा मनमोकळे पाने हसली , आणि निमिष पण . काही दिवसापूर्वी ती आकाशाला घेवून पुण्याच्या प्रवासाला निघाली होती आणि  आता याच जागी  तिनी आकाश , निमिष , आई बाबा , विनीता मावशी आणि …जे त्यांच्या नात्याला समजून घेतील अश्या सार्यांना घेवून एक नवीन प्रवास सूर करत होती . एक गोष्ट त्यांची पण संपली पण थांबली  नाही :)


समाप्त  






-- 
Sheetal Joshi 
Cell No : 9423208623