Friday 26 June 2015

एक गोष्ट त्यांची पण : भाग सातवा

एक गोष्ट  त्यांची पण : भाग सातवा 

आई आणि इरा हॉस्पिटल  मधून अक्षरश: पाच मिनिटात आल्या  आणि आकाशाची विचारांची मालिका थांबली . वातावरण हलके राहावे म्हणून असेल किंवा मुळातच स्वभाव म्हणून असेल  पण इरा नि गप्पा सुरु ठेवल्या होत्या . तसा हि निमिष गाडी चालवत असल्यामुळे तिला चिक्कार निवांत वेळ होता 
"५ वर्षात पण खूप बदल वाटतोय ग मला इकडे "- आकाश 
"म्हणजे काय , अरे ५ वर्षे हा मोठा काल  आहे , दोन वर्ष मध्ये generation gap जाणवते आज काल, हो किनई ग आई  "-इरा नि आई ला हि संभाषणात आणण्याचा प्रयत्न केला 
'आजूबाजूला बदल होत असतातच आकाश , आपण स्वीकारतो कसे त्यावर आहे सगळे . मी एका छोट्या घरातून आणि छोट्या शहरातून आले होते  आई बाबा सोबत . शहरात थोडे जास्त पैसे मिळतील आणि आम्हाला शिक्षण चांगले मिळेल या हेतूनी  . या शहरात नवीन होते , किती हि हुशार असले तरी सुरवातीला जर बुजालेच मी . तुझ्या काकांनी आर्थिक मदत केली आणि तुझ्या बाबांनी खूप सांभाळून घेतले मला . तुझ्या बाबांनी आत्मविश्वास दिला मला या शहरात वावरायला . अर्थात त्या वेळा आजच्या इतके मोठे , वाढलेले आणि कॉस्मो नव्हते हे शहर . तुझ्या आजी नि तर माझा कायापालटच केला . एकाच वाक्य म्हणाल्या त्या , शहरे आणि आजूबाजूची माणसे बदलत राहतात , आपण हि काळा प्रमाणे बदलायचे , पण आपली नैतिक तत्वे सांभाळून . आणि ज्याच्या कडे ज्ञान , प्रामाणिक पणा आणि माणूस जोडायची कला आहे ना  , तो पृथ्वीच्या पाठीवत कुठे हि राहू शकतो , सुखात . माझ्या आयुष्यात हे लोक आले नसते तर माझे आयुष्य नक्की वेगळे असते , कदाचित लौकिक अर्थाने सुखी असते , पण इतकी समृद्ध असते कि नाही कुणास ठावूक . आयुष्यात काही वेळा चुकली असेन मी सुद्धा , शेवटी माणूसच आहे . पण जगताना  खूप म्हत्वाचे निर्णय घेण्यामध्ये  खूप मदत केली मला तुझ्या आजीने , बाबांनी आणि काकांनी . आज तुझा काका , अवि हवा होता , त्याला खूप आनंद झाला असता , तुम्हा दोन्ही भावंडांचे एकमेकांवर असलेले प्रेम बघून . त्याचे आणि तुझ्या बाबाचे पण असाच होते अगदी . पण आता मला या शहरात राहायचा कंटाळा आलाय . कुठे तरी जवळ पास पण निवांत छोट्या गावात राहावे असे वाटतय ". 
"आई , अजून इतक्यात तरी अहि नाही ह . मला एकटे पडायला होईल ."
"इरा, अग एकटे असायला काय झालाय , निमिष आहे कि हक्काचा आता . त्याला कटकट कर आता :) आणि आकाश पण आलाय कि परत आता , बरोबर आहे न आकाश . आणि अग मी काय लगेच चाललीय का ."
आज आकाशाला आई वेगळीच वाटत होती थोडी .त्याला वाटत  पाच वर्षात शहर च काय पण आई पण थोडी बदलली आहे असे त्याला वाटत होते . स्वतः बद्दल , आपल्या घरंच्या बद्दल आई इतकी मोकळे पणानि कधीच बोलली नव्हति. आजी , काका , ती आणि बाबा यांचे जुने फोटो खूप वेळा पहिले होते आम्ही , कधी कधी तिच्या सोबत सुद्धा , ती पाहताना रमायची , पण बोलली कधीच नाही , कधी आठवणी सांगितल्या नाहीत . आई खरच  एकटी पडलीये का कि विचार करून करून थकलीये ती . कि आपले जे काही बोलणे झाले तेव्हा पाच वर्षापूर्वी, त्यमुळे थोडी बदलली आहे  . कदाचित आज मी तिला थोडे समजून घेवू शकतो , कदाचित काही इ साठी माफ हि करू शकतो . तेव्हा मी पण पंचविशीत च होतो कि . काही का असेना पण आता मी थोडे समजून घायला च हवे . आणि मी आणि ती दूर झालो तरी , इरा त्यांना दुरावली हेच विशेष . मला हि तेच तर हवे होते . आता तर मला उलट , त्या दोघी एकमेकांच्या जास्त जवळ आल्या आहेत असा वाटतय . Two is a company and three is crowd and may be that third person was me . आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली कि आई नि त्याला परत येण्या साठी सुचवले आहे बोलता बोलता . खरच मी यावर काहीच विचार नाही केला आहे अजून . 
"दादू , तू कसा रे असाच आहेस , निम्म्या वेळा हरवलेला स्वत मधेच . लक्ष दे न आमच्या कडे . तू मला काय घेवून  ते बोल . डॉलर  मधले बजेट आहे न "
"घे ग तुला काय हवे ते , मी कधी नाही म्हणालोय का . पण मला असे सांगता नाही येणार  काय ते . असे कर आई बाबांनी एखादा हट्ट पुरवला नसेल तर तो माझ्या कडून वसूल कर , म्हणजे सगळेच खुश "
"डन , मग माझे ठरलच आहे "
"हे बरे आहे , तुम्हा बहिण भावांचे  काय हो काकू . म्हणजे लग्न नंतर मी पण एखादा हट्ट  नाही पुरवला तर चालेल नाही का , तिचा भाऊ  आहेच कि , म्हणजे तेव्हा पण सगळेच  खुश "
" असे नाही हा, चालायचे जावई बापू . माझ्या बहिणीची तक्रार येवून उप्गोग नाही "
एकंदरीत  सगळे हसत खेळत पार पडत होते . निमिष चे आई बाबा पण आले होते . खूप बरे वाटले 
त्यांना पण . ह्या सगळ्या मुलांना त्यांनी लहानाचे मोठे होताना पहिले होते  आणि आकाश आणि इराचे विशेष  कौतुक होते त्यांना , तसे ते निमिष ला म्हणाले सुद्धा . आमच्या माघारी , आता निमिष ची काळजी नाही , तू आणि इरा आता मित्रच नाही तर नात्यांनी पण जोडले गेले ,खर तर निमिष लाही त्याची भावंडे आहेत , पण त्यांचे नाते तुमच्या सारखे नक्कीच नाही . आमचीच मुले आहेत , म्हणजे वाईट कुणीच नाहीत , पण एकमेकासाठी इतका वेळ आणि त्याग करणे त्यांच्या स्वभावातच नाही . गरजेला धावून येतील हि , पण ते तर रक्ताच्या नात्याची ओढ म्हणून . 
अजून एक दिवस तर गेला , रात्र सुरु झाली कि आकाश च्या स्वताशीच गप्पा सुरु . उद्या येतो असे आपण म्हणालो आहे खर पण , … काय होईल , जमेल का आपल्याला . कधी कधी जास्त ओळखीच्या ठिकाणीच गुदमरायला होते कारण अपेक्षांचे ओझे पण तितकाच मोठे असते न . 
सकाळी आकाश ला जग, थोडी उशीरच आली . बाहेर च्या खोलीत हसण्याचे , गप्पाचे आवाज येत होते . बाबा इतक्या सकाळी कसे आले आहेत , आवाज नक्की त्यांचाच . आणि आता इथे कशाला भास होतील , आकाश बाहेर आला , निमिष आणि बाबा गप्पा मारत होते . गेल्या  वर्षात कधी तरी विडीओ chat वरच पहिले असेल . 
"शुभ प्रभात , साले बाबू , चहा घेणार का ?"- निमिष 
"शुभ प्रभात , चहा चालेल , पण आज मीच करतो आपल्या सगळ्यान साठी . बाबा तुम्ही इतक्या लवकर कसे ?, म्हणजे आई म्हणाली होती  तुम्ही याल , पण मला वाटले  दुपारी याल ", आकाश ला वाटले , काय बोलतोय हे  आपण , साधे तुम्ही कसे आहेत हे पण नाही विचारले , सुचत नाहीये म्हणून चहा करण्याचा बहाणा 
"अरे लवकर आलो मुद्दामून , आई ला म्हणाले , आकाश ला थोडे लवकर घेवून , तसाच कार्यलय मध्ये जावून येतो , आणि मग तसेच घरी जावू . आणि खायला पाठवलाय आई नि , आज तुम्हा दोघा सोबत नाश्ता . आकाश , थोडा वेगळा दिसायला लागला आहेस , म्हणजे थोडा खराब झाला आहेस . अर्थात तुला प्रत्यक्ष बघून फार वर्षे झाली . पण बरे झाले आलास आणि घरी येतो म्हणालास हे तर उत्तम . तिथे गरज आहे तुझी . शेवटी इरा म्हणाली तेच खरे "
"काय म्हणाली इरा ?, आणि तुम्ही खूप दिवसांनी पहातंय म्हणून खराब वाटतोय , पण असे काही नाहीये , सुरवातीला जर सेट होई पर्यंत गडबड होती , आता तसे निवांत आहे . पण हे इरा काय म्हणाली ?"
"काही नाही रे , तिनी मला प्रॉमिस  केले होते कि तु नक्की येशील आणि खरे केले तिने . खर तर आम्हीच  तू आलास त्या दिवशीच तुला घरी आणायला हवे होते . पण तू येशील कि नाहीस असे वाटले . मग इरा नि च सुचवले इथे राहायचे "
"अरे , मी काही नाही येणार घरी बाबा . उलट मला वाटले , कि इतके लोक घरात आणि त्यात मी इतक्या वर्षांनी आलो तर सगळ्यान अवघडल्या सारखे वाटेल . उलट बराच झाले कि , मला तुम्हाला , आई ला , इरा ला , निमिष  ला निवांत भेटता आले ."
"मला माहितीये बेटा , सगळे एकदा पूर्ववत नाही शकणार . आपल्याला वेळ द्यायला हवा . काही गोष्टी सहवासाने सुद्धा बदलतात . मी  वर्ष पूर्वीच खर तर , माझे मत व्यक्त करायला हवे होते . पण गोष्टी अश्या घडल्या कि मी काही ठाम भूमिका घ्यायच्या मनस्थित नव्हतो . तू आणि अनू एकमेकांना अनुरूप होता असे मला वाटत होते आणि इरा चे म्हणशील तर तिला आपल्या घरात तेच सगळे हक्क आणि अधिकार होते जे तुला पण होते . इराच्या बाबतीत मी पण जर हळवा  आहे , आणि जे घडत होते त्यातले तिला काहीच कळू नये म्हणून माझी धडपड सुरु होती . आणि म्हणूनच मला तुझा निर्णय पटला होता , पण मी ठाम पणे तुझ्या पाठी शी उभा नाही राहू शकलो . निर्णयाची जबाबदारी टाळता  यावी म्हणून अनेक महत्वाच्या क्षणी मौन होतो , आयुष्य भर , हेच चुकले माझे . अनु काही खलनायिका नव्हती , पण अशी महत्वाकांक्षा असलेली मनसे , कधी कधी टोकाला जातात आणि केवळ स्वतचा विचार करतात . आणि याचा मला अनुभव आहेच कि . जे  झाले ते योग्य झाले , चुकून जरी इराला जास्त काही कळले असते , तर ती पोर पार खचून गेली असती . तिच्या मूळेच  सारे घडले असे तिला वाटले असते . आणि खर सांगू , काही काही गोष्टी अश्या असतात कि ज्यांचे ओझे आपण आयुष्यभर बाळगतो . ती वेळ माझ्या मुलांवर  येवो . असू दे , मी काय बोलत बसलो हे "
"असे काही नाही रे   बाबा , उलट मला बर वाटले कि तू इतका मोकळा बोललास माझ्या सोबत . कदाचित इतका वेळ गेल्या मुले आपण सगळेच आपल्या आपल्या पद्धतीने विचार करत होतो , जे घडले त्याचा . काही गोष्टी घडतातच , बदलत नक्की नाही येत . पण जे होते ते चांगल्या साठीच . कदाचित मी दूर होतो म्हणून तुम्ही तिघे थोडे जास्त जवळ आलात , तुम्ही मुलीची आणि मुली तुमची जबाबदारी निभावली.  अजून थोडा वेळ गेला न कि सगळे छान होईल पहिल्या प्रमाणे किंवा त्या पेक्षा हि छान . कदाचित आपण सगळेच एकमेकांना  गृहीत धरत  जातो आणि गुंता वाढत जातो . "
"खरे आहे , आणि माझे पण जरा  काही गोष्टीत दुर्लक्ष झाले खरे . पण तू  मला त्याची जाणीव करून दिलीस . नाही तर , मी स्वताला आयुष्यात कधीच माफ करू शकलो नसतो , तुझ्या आजीला , आणि काकाला मी शब्द दिला होता कि त्यांच्या माघारी  मी हे घर दुभंगू देणार नाही . पण आकाश , मला असे वाटतय कि तू आता परत यायचा विचार कारावास आणि स्वताच्या पुढच्या आयुष्याचा पण . इरा नि तिचे एक पाऊल  पुढे टाकल आहे . म्हणजे तिची  जबाब दरी संपली असे वगैरे नाही . पण तरीही …किती वाजता निघू यात आपण  "
"आलोच , १०-१५ मिनिट लगेच . बाहेरची काम करून परत येवू , मला थोडे समान आवरावे लागेल , मग जावू , दुपारी आपल्या घरी. निमिष तू येतोस का आता आमच्या सोबत  "
"नको रे , आज आई बाबा येतात न , त्यांना आणायला जातोय मी  .  आम्ही इथे २-३ दिवस राहू , आणि मग नंतर कार्यक्रम आमच्या जुन्या घरीच आहेत . कदाचित , मी फक्त झोपायलाच येयीन आणि कुणी आले तर येयिल. इराकडे पण एक किल्ली आहेच इथली , जर कधी लागले तर वापरा तुम्ही पण "
आकाश आणि बाबा बाहेर पडले . आज आकाशाल खूप छान वाटत होते , आई -बाबा दोघे पण भेटले . मनाची घालमेल थोडी कमी झालीये आता . दुपारी आकाश , त्याच्या घरी आला . वास्तू शी पण आपले एक नाते असते , असख्न्या आठवणी असतात . आकाशाला आठवत होते कि ४ एक वर्षाचा असेल ,तो  आई बाबा त्याला सोडून एक वर्षे , काका राहत होता तिकडे जाणार होते , वैद्यकीय सेवा दुर्गम भागात पोचावी म्हणून . आजोबांची ती एक अट  होती . आजी सांगायची कि , आई बाबा ची जर टाळाटाळ  होतीये असे लक्षात आले आणि आजोबांनी सांगितले कि , मी आधी म्हणत होतो तेव्हा गेला नाही आणि आता , मुलगा लहान आहे , मग त्याची शाळा असेल हे आयुष्य बहर सुरूच राहील . दवाखाना आणि आकाश ला आम्ही सांभाळू वर्ष दीड वर्षे . तुम्ही जावून या. तशी आकाशाला आजी आजोबांची सवय होतीच आणि अधून मधून ते इकडे येणार किंवा आजी आजोबा तिकडे जाणार आकाश ला घेवून असे ठरले . काका पण खूप लाड करायचा आपले , आपण तिकडे जायचो तेव्हा . आकाश ला आठवले कि साधार १ वर्षे आणि ३ एक महिने झाले आणि आई बाबा आले . आणि त्यांच्या सोबत एक छोटी , गोड बाहुली सुद्धा आली . माझी इरा , मला किती आनंद झाला होता न तेव्हा . घरात पण खूप दिवसांनी सगळे खुश होते . कारण त्या आधी , आजी आजोबा मधेच खूप शांत शांत असायचे . नंतर मोठा झाल्या वर  कळले कि अवि काका हे जग सोडून गेला त्याचे हे दु:ख होते . किती लवकर जातो काळ , आणि  आता काही दिवसात इराचे लग्न आहे . 
आकाश घरात आला , घर सगळे तसाच होते , त्याची रूम पण . इरा ५ वर्ष पूर्वी दुसऱ्या  रूम मध्ये शिफ्ट झाली ती तिथेच राहिली , जणू तिने आपल्या साठी केलेला हा पहिला त्याग किंवा आपल्याला दिलेली भेट . 
"आई दादू आला ग "- इराच्या आवाजात कमालीचा आनंद ओसंडून वाहत होता . तिने आल्या बरोबर त्याचा आणि सामानाचा ताबा घेतला . घर एकंदरीत नॉर्मल वातावरण होते . आकाश येणार याची कल्पना असल्यामुळे  असेल कदाचित . खूप दिवसांनी त्याला शांत झोप लागली , कसलीच स्वप्ने किंवा भास न होता . शेवटी आपले घर ते आपले घर  , असे वाटलाच त्याला 
लग्न घरातले दिवस भरभर जात होते , आकाश आल्यामुळे नूरच पालटला होता . सगळी सूत्रे त्याच्या कडे होती आणि आई बाबा थोडे निश्चिंत झाले . इराच्या एक हट्टामुळे हे घर परत एकत्र आले होते . इरा तिच्या मैत्रिणी सोबत बाहेर गेली होती , बाबा दवाखान्यात . बाकी सगळे पाहुणे इकडे तिकडे फिरायला गेले होते कारण आज तसा कोणताच कार्यक्रम नव्हता . आई आणि आकाश दोघेच होते 
"आकाश , तुला बरे वाटतय न रे इथे , म्हणजे राहायला ।"
"हो ग , आपल्या घर सारखे सुख नाही बघ जगात , माझे तर सगळे आयुष्याच या घरात गेलाय . मला छान वाटतय "
"एक विचारू "
"मी परत येण्या बद्दल , काय ठरवलंय असाच न "
"हो "
" आता काहीच ठरवले नाहीये , येयीन हि कदाचित . पण जे काम हातात घेतली ते पूर्ण करून किंवा त्याची पुढची सोय लावून यायला हवे न . आणि इकडे परत येवून …. तसा काही प्रोब्लेम नाहीये . माझे काही जुने सहकारी होते , तुला आठवतील बघ , सानिका , सुमित , कुमार वगैरे , त्यांनी स्वतचा युनिट  सुरु केलाय . मला पण बोलवत आहेत , रिसर्च च काम आहे , माझ्या आवडीचे "
"मग तू काय ठरवले आहेस "
"अजून काहीच नाही , पण विचार करेन इतकाच सांगतो "
"आकाश , जे झाले ते विसरून जा . सगळी कटुता , समज गैर समज मागे टाकले तरच आपण पुढे जावू शकतो "
"विसरेन कि नाही सांगता येत नाही , पण कटुता नक्कीच नाहीये ग आता . पण तुम्ही इराला काही नाही सांगितले आहे न , मागचे . "
"नाही बाळा , तिला हे कधीच कळणार नाही , आमच्या कडून तरी . खर तर तिला  माहितीये , अगदी निमिष आणि त्याचा आई बाबा ना  पण . "
"पण इरा ला नाही सांगायचे कुणीच "
लग्नाला फक्त ३ च दिवस राहिले होते आता , आणि आकशा अजून एखादा आठवडा च होता इथे . मनावरचे ओझे खूप कमी झाले होते , सगळ्यांच्याच . जे काही घडते ते नियातीमुळेच .
भविष्य काळात काय होते हे आपल्याला काळात नाही आणि भूतकाळ आपण डावलू शकत नाही हेच खरे , आणि वर्तमानात काळात , भविष्याची हुरहूर आणि भूतकाळाची सावली असतेच कि सोबत 
अनु आली आपल्या आयुष्यात , पण बराच काही शिकवून गेली . तिच्या मुळे खूप गोष्टींचा उलगडा झाला मला, माझ्याच मनात असलेल्या प्रश्नाचा . व्यसनी महाभारत लिहिले आहे असे कि आपल्या सगळ्यान मध्ये त्याच्या प्रत्येक पात्रातले काही तरी गुण दोष आढळतोच .  सगळेच कधी तरी अर्जुन असतात , कृष्ण मिळाला आपला , तर पेच सुटतो , मला तेव्हा मिळाला माझा कृष्ण आणि आता …. जर नाही मिळाला तर ……  असे आकाश ला वाटले . कदाचित आई , बाबा , तो सगळेच आपापला कृष्ण शोधत होते आणि इरा …. ती कदाचित या सगळ्यात नव्हतीच मुळी …। 
क्रमश :  




 





No comments:

Post a Comment